Ahmednagar Crime : चार खुनांचा आरोप असलेला सिरीअल किलर मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (58) याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे ही घटना घडली. अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. नेमकं प्रकरणं काय? रविवारी (10 डिसेंबर) सायंकाळी अण्णा वैद्य याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. […]
Nashik Train Accident : देशात सातत्याने रेल्वे अपघाताच्या (train accident) घटना घडत आहेत. आताही आणखी एक रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातामुळं कसारा-इगतपुरी आणि नाशिककडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिककडे जाणारे प्रवासी अडकून पडले आहेत. मात्र, या […]
Ahmednagar News : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून चांगलाच वाद पेटला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) हे प्रयत्नशील आहेत. यामुळे सध्या मनोज जरांगे व मंत्री भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. यावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी यांनी जोरदार टीका केली आहे. राजकारणात सध्या राजकारण्यांची भाषा खालावत चालली […]
अहमदनगर – कांद्याची (Onion) देशामध्ये उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आहे. मात्र कांदयाला चांगला भाव मिळत असताना केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. […]
Sujay Vikhe : केंद्र सरकारच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत मात्र इथेनॉल निर्मिती प्रकल्प पूर्णपणे बंद नसून बी हेवी याला बंदी नसून ‘ज्यूस टू इथेनॉल’ याला बंदी घातलेली आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, […]
अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी मात्र धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यामुळे अद्याप तरी दुष्काळाची झळ बसली नाही. मात्र जिल्ह्यातील एक तालुका असाही आहे कि जिथे महिन्याभरात केवळ दोनदा पाणीपुरवठा हा होतो. नगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात 15 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा (water supply) केला जातो. विशेष म्हणजे जायकवाडी धरण उशाशी असलेल्या शेवगाव […]