- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
कधी इचलकरंजीत, कधी अहमनगरमध्ये तर कधी बुलढाण्यात! गजानन महाराज म्हणून अवतरणारे बाबा नेमके कोण?
बुलढाणा : येथील खामगाव तालुक्यातील सुटाळपुरा परिसरात संत श्री. गजानन महाराज (Saint Shri. Gajanan Maharaj) अवतरल्याची बातमी पसरल्याने कालचा संपूर्ण दिवस खळबळ उडाली होती. या बाबांच्या येण्यामुळे या परिसराला भक्तांच्या गर्दीने अक्षरशः यात्रेचे स्वरुप आले होते. सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव नावाच्या व्यक्तीच्या घरी हे बाबा अवतरले होते. बघता बघता संपूर्ण पंचक्रोशीत ही माहिती पसरली आणि […]
-
MPSC ला मिळाले अध्यक्ष! पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हाती कारभार
MPSC : मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी राज्य सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांची नियुक्ती केली आहे. याआधी फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे आयोगाच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्ष पदावरून किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर हे […]
-
पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत खदखद वाढली : अजितदादा गटातील सर्व मंत्री फडणवीसांच्या भेटीला
पुणे : शिंदे सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांचा समावेश होऊन आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. या काळात या मंत्र्यांना खातेवाटप झाले, मात्र अद्यापही त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. मागील अनेक दिवसांपासून मागणी करुनही अद्याप पालकमंत्रीपदाचे फेरवाटप करण्यात आलेले नाही, हे फेरवाटप आता लवकरात लवकर करावे, अशी मागणी […]
-
Video : “तेवढं पवार साहेबांना सोडू नका”; चिमुकल्याचा अमोल कोल्हेंना ‘कानात’ सल्ला
सातारा : मध्यंतरी अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीसोबत फारकत घेत शिंदे-फडणवीसांसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद सुरू आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यतील विविध भागात जात सभा घेतल्या या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांशी शरद पवारांची […]
-
जातीय जनगणनेवरुन केंद्र अन् राज्य भाजपमध्ये विरुद्ध प्रवाह? बावनकुळे आग्रही; मोदींची टीका
मुंबई : बिहारने नुकतीच जातीय जनगणना करत काल त्याची आकडेवारीही जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्रातही जातीय जनगणनेची मागणी जोर धरत आहे. यामध्ये भाजपचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी यासंदर्भात उघडपणे मागणी केली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही आपण राज्य सरकारकडे मागणी करावी अशी विनंती देशमुखांनी केली. त्यामुळे […]
-
विधानसभेत टाईमपास – 1, 2, 3 सिरीज सुरु, दिग्दर्शक अध्यक्ष राहुल नार्वेकर : राऊतांचा खोचक टोला
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत टाईमपास 1, 2, 3 अशी सिरीज सुरु आहे, त्याचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आपले अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आहेत, असा खोचक टोला शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नांदेड येथील घटनेवरुन शिंदे सरकरावर टीका केली. शिवाय जातीयजनगणेवरही त्यांनी सविस्तर भाष्य केलं. […]









