‘घरची करते देवा देवा, बाहेरचीला चोळी!’ हिंदीवरून रोहिणी खडसेंचा महायुती सरकारवर घणाघात

Rohini Khadse Criticized Mahayuti Sarkar : राज्यात सध्या हिंदी सक्तीवरून वातावरण तापलेलं (Hindi Compulsory In School) आहे. जळगाव जिल्ह्यात 32 शाळांमध्ये 4 वर्गांना एक शिक्षक शिकवतोय. मराठी बेरोजगार तरुण असताना मराठी शिक्षकांची संख्या बघा. हिंदी भाषिक शिक्षक भरती करुन कोणाला रोजगार देता, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केलाय. घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा, असा देखील टोला यावेळी (Mahayuti Sarkar) त्यांनी लगावला.
BJP Headquarters : भाजप मुख्यालयात सहा दिवस ड्युटीवर असणार राज्यमंत्री, नेमकं कारण काय?
हिंदीचा अट्टाहास का?
हिंदी भाषेला विरोध नाही. मात्र, अट्टाहास का? हिंदी पाचवीपासून शिकवता ना. सरकारचा आणि मंत्र्यांचा हेतू आणि सारखं खोट बोलणं. सत्तेतील एक जण वेगळी बाजू मांडतो. लहान मुलांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा काम सरकार करते, असा आरोप देखील यावेळी रोहिणी खडसे यांनी दिला आहे. आम्ही सुद्धा मोर्चात सहभागी होणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
Shefali Jariwala : तरुण दिसण्यासाठी…; शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितलं?
निवडणुकीच्या आधी दिलेली गाजरं
पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. निवडणुकीच्या आधी दिलेली गाजरं, त्याची आठवण सरकारला व्हावी. नुसत्या घोषणा केल्या पुढे काय? ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चाललंय त्यांनी आश्वासनं दिली. आज ह्या तिघांचा गाजर घालून सत्कार केला पाहिजे, असंही खडसे यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राला गाजर दाखवले म्हणून हा सत्कार. ही गाजरं पाहून त्यांना, त्यांनी दिलेल्या गाजरांची आठवण येईल. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? कर्जमाफीचं काय? सर्वात जास्त आत्महत्या करणारं राज्य आपलं आहे, असंही खडसे यांनी म्हटलेलं आहे.
गाजरांचा महापूर
जीवनाशक्य अत्यावश्यक वस्तूंवर किमती कमी झाल्या नाहीत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ आश्वासन दिले. मात्र, विसर पडलाय. त्यांचेच झिरवळ म्हणतात, आम्ही असे म्हटलो नाही. मात्र, त्यांच्याच पेजवर मोठ्या मोठ्या पोस्ट पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या गाजरांचा महापूर आल्याचं देखील खडसेंनी यावेळी म्हटलं. भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करू, पण तसे नाही. ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले, ते त्यांच्या मांडीला लावून सत्तेत बसलेत. अजित पवार यांच्यावर आरोप केले आणि तेही मांडीला मांडी लावून बसले, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे.