नागपूर : आपलं सरकार सत्तेत येऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्रातील निर्णय-लकवा आपण संपविला. निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बैठकीत महाविकास आघाडीवर केली. गेल्या अडीच वर्षात कोणत्याही घटकाला मदत त्यांनी केली नाही. विकास कामांना स्थगिती […]
नागपूर : भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत? […]
नागपूर:अनेक कारणांमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादात अडकले आहेत. त्याविरोधात महाविकास आघाडीने आंदोलने केली आहेत. आता पुन्हा राज्यपाल हे एका वादात सापड. रामटेक येथील संस्कृत विद्यापीठ परिसरात उभारलेल्या माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहे. याबाबतचा मुद्दा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी […]
नागपूर : नागपूर न्यास जमीन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तत्कालीन नगरविकास मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर बोट ठेवण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जमीनीचे वाटप झालं कसं? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. यावरुनच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काही लोकं मुख्यमंत्र्यांना […]
नागपूर : मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बावनकुळे हे बोलले. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जो जो समाज फडणवीस यांच्याडे गेला, त्या समाजावरी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे […]
नागपूर : सीमावर्ती लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे उभा आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे. यासंदर्भात आज लोकतांत्रिक पद्धीतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली. या संदर्भातली चर्चा कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांशी करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदत दिली. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागाबाबत राज्याची भूमिका तसूभरही मागे […]