औरंगाबाद : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्यासाठी त्यांनी सरकारदरबारी अनेकदा मागणी केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणाऱ्या […]
नागपूर : नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे ही धमकी दिली. या घटनेनंतर पोलिसांकडून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तत्कालीन भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर […]
नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहेत. ‘सीबीएसई’ कडून दोन्ही बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येईल. CBSE १० वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते […]
नागपूर : कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणी हिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील 30 गावांचा समावेश […]
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. आज देशात सत्तेत असलेल्या भाजपला एकेकाळी संपूर्ण बहुमताने सत्तेत यायला 2014 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. आज जरी सत्तेत असले, काही काळ राहिले तरी एक ना एक दिवस सत्ता जात असते. प्रत्येकाचा दिवस येत असतात. आज सत्तेत असलेल्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये. सत्तेच्या […]
नागपूर : पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रामुळे कोकणातील गावांना अनेक बंधने पडली आहेत. कोकणातील गावांचे सूक्ष्म सर्वेक्षण केले गेले असून त्यानुसार पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून एकूण 388 गावे वगळण्याचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. याविषयावर आमदार श्री भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर […]