India-Pak War : भारत अन् पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालंय का? कोण करतं औपचारिक घोषणा…

India Pak War Who Will Declare formally Full Scale War : ६ मे च्या रात्री भारताने पहलगाम हल्ल्याला (Pahlgam Attack) प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर पेटून उठलेल्या पाकिस्तानने 8 मे च्या रात्री भारत पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या नागरी भागांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत सर्व हल्ले परतून लावले. या सर्व घडामोडींमध्ये दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, खरचं युद्ध (India-Pakistan War) सुरू झाले आहे का? असा प्रश्न सर्व सामान्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. जर हो, तर, युद्ध सुरू झाल्याची औपचारिक घोषणा कोण करतं याबद्दल जाणून घेऊया…
India-Pak War : पाकचे ना-पाक इरादे उद्ध्वस्त; 12 तासात काय झालं? 10 अपडेट्स, एका क्लिकवर…
युद्ध अचानक सुरू झाल्यासारखे वाटत असले तरी, ते एखाद्या आजाराप्रमाणे हळूहळू पसरते. ज्याचे मूळ काही घटनेशी असू शकते. उदा. जर आपण भारत आणि पाकिस्तानबद्दल बोललो तर, पहलगाम हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला मानला गेला त्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानसोबतचे अनेक करार रद्द करत पाकिस्तानी नागरिकांनाही देश सोडण्याचे आदेश दिले.
यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर अनेक निर्बंध लादण्यास सुरुवात केली. तिसऱ्या टप्प्यांतर्गत सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यात आली. तर, दुसरीकडे भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत कारवाई करत निवडक ठिकाणांवर हल्ले केले. याला ऑपरेशन किंवा मर्यादित लष्करी कारवाई असे म्हणतात.
Video : अंगावरची ओली हळद अन् हातावर रंगलेली मेहंदी; लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी ‘जवान’ बॉर्डरवर…
फुल स्केल वॉर कधी सुरू होतं?
पूर्णपणे खुल्या युद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा लढाई देशाच्या सीमेपुरती मर्यादित राहत नाही तर, देशात कुठेही होऊ शकते. शत्रूराष्ट्र कुठेही अचानक हल्ला करू शकतो. या टप्प्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे अणुयुद्ध. पण दोन्ही देशांमधील समेटासाठी मोठ्या शक्ती पुढे येत असल्याने याची शक्यता फार कमी आहे.
सामान्य नागरिकांना कधी कळते की युद्ध सुरू झाले आहे?
संविधानात राष्ट्रीय आणीबाणीचा उल्लेख असला तरी, युद्ध घोषित करण्याची थेट प्रक्रिया नाही. पण जर युद्धाची घोषणा करण्याची वेळ आली तर, राष्ट्रपतींना तसे करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद असलेल्या संविधानाच्या कलम ३५२ ला युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्याचा सर्वात जवळचा मार्ग मानला जातो.
ICAI CA Exam Postponed : भारत-पाक तणावाचा विद्यार्थ्यांना फटका; CA ची मुख्य परिक्षा पुढे ढकलली
निर्णयात कोण कोण सहभागी असते?
– राष्ट्रपती हे सैन्याचे सर्वोच्च कमांडर आहेत, याचा अर्थ त्यांच्याकडे हा अधिकार आहे. पण ते स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यांना सरकारचा सल्ला घ्यावा लागतो. जर कधी युद्ध किंवा शांततेची औपचारिक घोषणा झाली तर, ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने केली जाते.
– प्रत्यक्षात युद्धाचा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ घेते, ज्यामध्ये संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचा समावेश असतो.
– आवश्यकतेनुसार लष्करप्रमुख, गुप्तचर संस्था आणि डिप्लोमेट्सचे मत देखील घेतले जाऊ शकते.
– संसद संरक्षण बजेटला मान्यता देते आणि सरकारकडून उत्तरे देखील मागते.
कागदावर काय घडते?
जर सरकारला असे वाटत असेल की परिस्थिती आणखी बिकट झाली आहे आणि युद्ध अधिकृतपणे घोषित केले पाहिजे, तर सर्वजण एकत्र बसून निर्णय घेतात आणि राष्ट्रपतींना लेखी शिफारस पाठवतात. यानंतर राष्ट्रपती कलम ३५२ अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतात. यात देशाच्या निवडक भागांमध्येही आणीबाणी लागू केली जाऊ शकते. जर, संसदेने मान्यता दिली तर आणीबाणी 6 महिन्यांसाठी लागू राहते. गरज पडल्यास, ती आणखी पुढे सरकते. जेव्हा सरकारला वाटते की, परिस्थिती नियंत्रणात आहे, तेव्हा राष्ट्रपती आणीबाणीचा निर्णय कधीही मागे घेऊ शकतात.
Operation Sindoor : हुजूर अब बख्श दीजिए! ऑपरेशन सिंदूरचा दणका बसताच पाकिस्तान वठणीवर
एवढी युद्ध झाली पण कधीच औपचारिक घोषणा केली नाही
– भारत आणि पाकिस्तानमधील पहिले युद्ध काश्मीरवरून झाले होते, जेव्हा पाकिस्तानी आदिवासी सैनिक आणि पाकचे सैनिक जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसले होते. पण दोन्ही देशांपैकी कोणीही त्यांच्या देशात युद्ध घोषित केले नाही, त्यांनी फक्त लढाई सुरू केली.
– साठच्या दशकात भारत-चीन युद्धातही असेच घडले. चीनने अचानक सीमेवर मोठी लष्करी कारवाई सुरू केली. पण याही वेळेस कोणत्याच देशाने कोणतीही घोषणा केली नाही.
– १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध सौम्यतेने सुरू झाले परंतु, नंतर ते वाढू लागले. यावेळी देखील कोणत्याही बाजूने युद्धाची औपचारिक घोषणा करण्यात आली नव्हती.
– १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध बांग्लादेशावरून सुरू झाले होते. १३ दिवस चाललेल्या या लढाईत भारताने विजय मिळवला आणि बांगलादेश स्वतंत्र झाला, परंतु युद्धाची औपचारिक घोषणा झाली नव्हती.