Exit Poll : PM मोदींचं स्वप्न होणार साकार, NDA 400 पार; ‘या’ एकाच एक्झिट पोलचा अंदाज

Exit Poll : PM मोदींचं स्वप्न होणार साकार, NDA 400 पार; ‘या’ एकाच एक्झिट पोलचा अंदाज

Lok Sabha Election Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या (Lok Sabha Election Exit Poll) टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलमध्ये देशात एनडीए आघाडी हॅटट्रीक करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वतील एनडीएने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. मात्र इंडिया आघाडीनं कडवं आव्हान दिलं. परंतु, काही राज्यात काँग्रेसला जोरदार झटका बसताना दिसत आहे. तर फक्त इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 400 पारचं टार्गेट पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभेमध्ये पुन्हा ‘कमळ’ फुलणार की ‘तुतारी’ वाजणार?

या एक्झिट पोलनुसार एनडीएला 371 ते 400 जागा मिळतील तर विरोधी इंडिया आघाडीला 109 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला तामिळनाडूत 5 ते 7, केरळमध्ये 1 ते 3, कर्नाटकात 18 ते 22, तेलंगणात 8 ते 10, आंध्र प्रदेशात 4 ते 6 जागा मिळतील असा अंदाज आहे. या पोलमध्ये इंडिया आघाडीला 109 ते 139 जागांचा अंदाज दाखवण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेस 52 ते 64 जागांचा अंदाज आहे. या एक्झिट पोलमध्ये 28 ते 38 जागा अन्य पक्षांना 28 ते 38 जागा मिळतील असा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशात सात टप्प्यात मतदान घेण्यात आल. आज शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा होता. या टप्प्यातील मतदान सायंकाळी सहा वाजता संपलं. त्यानंतर थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडी पुन्हा चांगली कामगिरी करताना दिसत आहे तर विरोधी इंडिया आघाडीही जोरदार टक्कर देताना दिसत आहे.

मागील एक्झिट पोल खरे ठरले

2019 मध्ये निकालाआधी जे एक्झिट पोल जाहीर केले होते ते खरे ठरले होते. या एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीचा विजय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर मतमोजणी झाली आणि हा अंदाज खरा असल्याचे सिद्ध झाले होते. या निवडणुकीत एकट्या भाजपने 303 जागा मिळवल्या होत्या तर एनडी आघाडीला एकूण 353 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या. तर पूर्ण युपीए आघाडीला 91 जागा मिळाल्या होत्या. 2014 मधील निवडणुकीत भाजपला एकूण 282 जागा मिळाल्या होत्या.

Lok Sabha : ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज