Badlapur : संवेदना बोथट झालेले विरोधक; राजकारण करणाऱ्यांवर फडणवीसांचा भडका

Badlapur : संवेदना बोथट झालेले विरोधक; राजकारण करणाऱ्यांवर फडणवीसांचा भडका

Devendra Fadnavis On Badlapur Rape : संवेदना बोथट झालेले विरोधक असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदलापूर अत्याचार (Badlapur Rape) घटनेप्रकरणी राजकारण करणाऱ्या विरोधकांवर केलीयं. दरम्यान, बदलापूर घटना प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलायं. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळा कर्मचाऱ्यानेच हा अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. याविरोधात बदलापूरमध्ये नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बदलापूरमधील घटना निंदनीय असून शाळा कर्मचाऱ्याचं कृत्य निंदनीय आहे. या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, असाच राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाचा प्रयत्न आहे. घटना उघडकीस आल्यानंतर जी जी कारवाई केली पाहिजे. जी कारवाई झाली पाहिजे, तशीच कारवाई सुरु आहे. या केसच्या तपासासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आलीयं. विरोधकांच्या मनात केवळ राजकारण असून संवेदना बोथट झालेल विरोधक आहेत, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केलीयं.

निवडणूक जाहीर होताच माजी मुख्यमंत्र्याचे आश्वासन; जम्मू काश्‍मीरमधील ‘370’ बाबत केला ‘हा’ दावा

विरोधी नेते अशा घटनांमध्ये राजकीय पोळी भाजतात. विरोधकांच्या मनात केवळ राजकारण आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी असं खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही. ज्यावेळी अशा संवदेनशील घटना घडतात तेव्हा राजकीय न वागता जनतेला काय दिलासा देता येईल, न्याय कसा देता येईल असं वागलं पाहिजे. सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलयं.

‘मोहब्बत की दुकान खोलने से कूछ नही होता…,’ कॉंग्रेसच्या झिशान सिद्दीकींचा राहुल गांधींना घरचा आहेर

बदलापूरची घटना 13 ऑगस्टला घडली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ कारवाई सुरु झाली. या प्रकरणी कोणी दिरंगाई केलीयं का? त्याचा तपास केला जाईल. दिरंगाई करणाऱ्यांविरोधात अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असून चौकशी जलदगतीने होणार ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

नेमकं काय घडलं?
बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube