औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश श्रीराम राठोड आणि औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, लीला रोडे, मुक्तार शेख यांनी उपसरपंच निवडीसाठी सरपंचाला दोन वेळा मतदान अधिकाराविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. कोणत्याही निवडणुकीत एका उमेदवाराला एकदाच मतदान करण्याचा मतदाराला अधिकार असतांना, उपसरपंच […]
मुंबई : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना महावितरण कंपनी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. कंपनी आमची आहे, सर्वसामान्य वीज ग्राहकांची आहे. त्यामुळे कंपनी वाढली पाहिजे हीच भावना आमच्या आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप हेगडे यांनी दिली. प्रताप हेगडे म्हणाले, केवळ संपाने हा प्रश्न सुटणार नाही खरं म्हणजे उत्तर महावितरण कंपनीकडे आणि कर्मचाऱ्यांच्याकडेच आहे. […]
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसला धक्का दिला आहे. मंगळवारी श्रीगोंदा नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांनी दिपाली सय्यद यांच्या उपस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटात प्रवेश केला. श्रीगोंदा नगरपालिकेत शिंदे गटाचा पुढील नगराध्यक्ष करण्यासाठी दिपाली सय्यद यांचे प्रयत्न आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्या वर्षा बंगल्यावर पाठपुरावा करीत होत्या. यातूनचं त्यांनी काँग्रेसला […]
पुणे : आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जनजागर यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा राज्यभर निघणार आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन आवाज उठवला जाणार आहे. आज ( 4 जानेवारी 2023) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यात्रेला झेंडा दाखवणार आहेत. मोदी सरकराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली आहे. सरकारच्या धोरणाविरोधात आवाज […]
मुंबई : अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असंही ते विधी मंडळात म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर भारतीय जनता पक्षासह इतर संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, त्यावेळी ते […]
मुंबई : राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला. त्यानुसार इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी, तर आठवीचे 12.53 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे राज्यभरातील इयत्ता पाचवीच्या एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती. […]