निवडणूक आयोग आणि राहुल गांधींची हातमिळवणी झाली का?, सुजात आंबेडकरांचा सवाल

निवडणूक आयोग आणि राहुल गांधींची हातमिळवणी झाली का?,  सुजात आंबेडकरांचा सवाल

Sujat Ambedkar : विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतरही 76 लाख मतदान झाले, असा आरोप विरोधक कॉंग्रेससह (Congress) सर्वच विरोधी पक्षांनी केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून निकालाच्या ४५ दिवसांनंतर निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण फुटेज नष्ट करण्याचा आदेश दिला. निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेवरून सुजात आंबेडकरांनी (Sujat Ambedkar) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरच संशय व्यक्त केलाय. राहुल गांधी आणि निवडणूक आयोगाची हातमिळवणी झाली आहे का? असा सवाल आंबेडकरांनी केला.

पालिका निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच फुटणार ! प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर 

विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या 70 लाख मतदानाच्या विरोधात सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचितच्या वतीने सोमवारी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाला संबोधित करताना सुजाता आंबेडकर म्हणाले, बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं की 76 लाख मतदान अतिरिक्त झाले आहे. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिलं की आपण या विरोधात एकत्र लढूयात. मात्र त्याला खर्गेंकडून काहीही उत्तर आलं नाही.

पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांची मागणी 

निवडणूक आयोगाविरोधात बाळासाहेब आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. त्या पत्रानंतर निवडणूक आयोगाने लगेच आदेश काढला की 45 दिवसात डेटा डिलीट करण्यात येईल. याचाच अर्थ निवडणूक आयोग आणि राहुल गांधी दोन्हीही मिळालेले आहेत आणि ते निवडणुकीतील डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावाही सुजाता आंबेडकर यांनी केला.

ईव्हीएम संदर्भात आंबेडकर म्हणाले, पाचनंतर 76 लाख मतदान झाली हे इलेक्शन कमिशनचा डेटा सांगतोय. बाळासाहेबांनी 12 डिसेंबर 2024 रोजी निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहून याची माहिती मागितली होती. पण, इलेक्शन कमिशन आम्हाला म्हणतंय की आमच्याकडे कोणताच डेटा नाही. आता आम्ही आयोगाला एका माणसाला मतदान करण्यासाठी किती वेळ लागतो, याचा एव्हरेज वेळ द्या. पाच ते सहा दरम्यान किती मतदान झाले तेही सांगा? याची माहिती मागवली, असं ते म्हणाले. तसंच मतदारांची फसवणूक करून भाजपचे सरकार सत्तेत आले आहे, असा आरोपही आंबेडकरांनी केला.

यावेळी सुजाता आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही टीका केली. खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्षपदाचा मुखवटा घालून बसले आहेत. पण, खऱ्या भूमिका राहुल गांधीच घेत आहेत. त्यांनी खर्गेंना बाजूला अतिरिक्त 76 लाख मतांचा विषय हायजॅक केला आहे, त्यांनी एक पत्र लिहिलं मात्र पत्रानंतर काहीही काही केलं नाही, असं आंबेडकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube