Pune Rain: मुरलीधर मोहोळांचा चौकशीचा सूर; पाणी सोडताना सावध का केल नाही? चौकशी करणार

Pune Rain: मुरलीधर मोहोळांचा चौकशीचा सूर; पाणी सोडताना सावध का केल नाही? चौकशी करणार

Muralidhar Mohal : मुसळधार पावसाने कहर केला. तशातच मुठा नदीत पाणी सोडल्याने पुणे शहर पाण्याखाली गेल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. (Muralidhar Mohal) यामुळे अनेकांच्या घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला. तर दुसरीकडे, लोकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून बुधवारी रात्रीच्या ऐवजी पहाटे पाणी सोडल्याचं पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं. परंतु, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनावर पुराचं खापर फोडलं आहे. मोहोळ यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचंही म्हटलं आहे.

चौकशी करणार पुणेकरांनो घाबरू नका, वेळ प्रसंगी नागरिकांना एअरलिफ्ट करू; CM शिंदेंची ग्वाही

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही धरणं १०० टक्के भरली होती. त्यामुळे खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं. अधिकाऱ्यांनी पहाटे ३५ हजार क्युसेक पाणी येत असल्याची माहिती दिली होती. यामुळे पुण्याच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराची मदत घेण्यात आली. पूरग्रस्त कुटुंबियांच्या भेटी घेतल्यानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. जर ३५ हजार क्युसेक पाणी सोडलं असतं तर पूर आला नसता, असं म्हणत याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

सोडणार नाही  साताऱ्यात मुसळधार पावसाचा जोर कायम; 700 लोकांचं स्थलांतर, आलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडले

‘धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं. खऱ्या अर्थाने जलसंपदा खात्याचं प्रशासन आणि महापालिकेच्या प्रशासनात समन्वयाच्या अभाव दिसून आला. तुम्ही ५५ हजार क्युसेक पाणी सोडणार होतात तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं. लोकांना यासंदर्भात सावध करणं आवश्यक होतं. हे सगळं कुठल्याही प्रकार खपवून घेतलं जाणार नाही. याची निश्चितपणे चौकशी करु. मला सकाळी ५५ हजार क्युसेक पाणी सोडल्याची माहिती मिळाली होती. जर ३५ हजार क्युसेक पाणी सोडलं असतं तर पूर आला नसता. त्यामुळे आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही. याची चौकशी होणार आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

बुधवारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुण्यात मुठा नदी पात्रामध्ये ४०००० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे मुठा नदीला पूर येऊन डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालं आहे. दरम्यान, पुणे शहरासह लगतच्या गावांना बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या मुसळधार पावसाची दखल घेत प्रशासनाने शाळांना सुट्टी दिलेली आहे.

थेट रोश व्यक्त केला

दरम्यान, पुण्यातील पूरस्थिती पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागरिकांच्या रोशाला सामोरं जावं लागलं. या वेळी नागरिकांनी त्यांच्यासमोरच आपल्या व्यथा मांडल्या. तसंच प्रशासनाच्या कारभारावर थेट रोष व्यक्त केला. यानंतर माध्यमांशी बोलताना लोकांना झालेला त्रास पाहता त्यांचा रोष सहाजिक आहे. त्यांना त्रास झाला आहे. सूचना न देता मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला असल्याचं देखील मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. सध्या सर्व यंत्रणा काम करत आहेत. लवकरात लवकर लोकांना मदत कशी करता येईल, लोकांना सोयी सुविधा पुरवण्याचा काम कसं करता येईल, हे पाहणं सध्या सुरू आहे असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube