‘रोहित शर्मा अन् आगरकर ठरवतील तसं’; T20 वर्ल्डकपसाठी कार्तिकचा क्लिअर मेसेज

‘रोहित शर्मा अन् आगरकर ठरवतील तसं’; T20 वर्ल्डकपसाठी कार्तिकचा क्लिअर मेसेज

Dinesh Karthik on T20 World Cup Selection : आगामी टी 20 विश्वचषकाची तयारी सुरू झाली (T20 World Cup 2024) आहे. ही स्पर्धा जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत होणार आहे. या स्पर्धेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. मात्र कोणत्या खेळाडूंची निवड होऊ शकते याची माहिती समोर आली आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या टी 20 लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा वर्ल्डकपसाठी विचार होईल याची शक्यता दिसत नाही. आयसीसीने 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यासाठी 1 मे मुदत निश्चित केली आहे. दरम्यान, आगामी वर्ल्डकपमध्ये खेळण्याची इच्छा दिनेश कार्तिकने व्यक्त केली आहे. या स्पर्धेसाठी जे काही शक्य असेल ते करू असे कार्तिकने म्हटले आहे.

येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यावेळी दिनेश कार्तिक 39 वर्षांचा होईल. याआधी 2022 मधील वर्ल्डकप स्पर्धेतही कार्तिक संघाचा भाग होता. मागील वर्ल्डकपनंतर दिनेश कार्तिक खेळणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर क्रिकेट समालोचनाकडे वळाला होता. यानंतर आता त्याने पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा

भारतात सध्या टी 20 क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत तो बंगळुरू संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत कार्तिक जबरदस्त कामगिरी करत आहे. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिसनंतर सर्वाधिक धावा करणारा संघातील फलंदाज कार्तिक आहे. आता वयाच्या या टप्प्यावर संघाचं प्रतिनिधीत्व करणं ही माझ्यासाठी महान भावना असेल. भारतीय संघाकडून खेळण्यासाठी मी फार उत्सुक आहे. माझ्यासाठी टी 20 विश्वचषकात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणं यापेक्षा मोठी गोष्ट नाही. तरीदेखील राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि अजित आगरकर जो निर्णय घेतील त्याचा मी मान राखेल, असे कार्तिक म्हणाला.

टीम इंडियात स्पर्धा वाढली

हार्दिक पांड्या महत्वाचा खेळाडू आहे. परंतु, तो सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. टी 20 स्पर्धे त्याची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तरीदेखील संघात त्याची निवड होईल यात शंका नाही. तसेच विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रित बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह, सिराज, कुलदीप यादव यांची निवड निश्चित मानली जात आहे.

शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांचा विचार केला तर गिलने सध्याच्या टी 20 स्पर्धेत फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. तर जैस्वालही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे त्यामुळे त्याच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. या दोघांतून एकाची निवड करणे निवडकर्त्यांसाठी कसरतीचे ठरणार आहे. जर दोघांचीही निवड झाली तर रिंकू सिंह किंवा शिवम दुबे यांपैकी एका जणाचा पत्ता कट होऊ शकतो.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube