अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांची तर उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मंडळाला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर शेतकरी विकास […]
अहमदनगर : अखेर अहमदनगरच्या (Ahmednagar) उड्डाणपूलावर पहिला बळी गेलाच. दुचाकीच्या अपघातात नगरमधील अनिरुद्ध रामचंद्र टाक या वकिलाचा मृत्यू (Death) झाला आहे. पुलावरील वळणावर शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, टाक आपल्या दुचाकीवरून जात होते. एक वाहन त्यांना धडक (Accident) देऊन निघून गेले. घटनास्थळी पोहचलेले घरघर लंगर सेवेचे प्रमुख, […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचे काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनानंतर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची कोंडी झालीय. आपण जर सत्यजित तांबेंना जाहीर पाठिंबा दिला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आपल्यावर कारवाई करू शकतात. सत्यजित तांबेंच्या मित्रांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला होता. सत्यजित तांबेंच्या बाजूने […]
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयात काल दुपारच्या दरम्यान दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीत म्हंटलं की, अहमदनगर महाविद्यालयात शिकत असलेल्या करण पाटील नामक विद्यार्थी त्याच्या मित्रांसह महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठीचं निवेदन देण्यासाठी प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात होता. पाटील प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात असतानाच […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केलेले उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केल्याने अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. प्रदेश काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलेला नसताना अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्यावतीने बाळासाहेब साळुंखे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय. तांबेंना पाठिंबा देण्याबाबतची कारणे […]
अहमदनगर : श्रीरामपूर शहर पोलीसांनी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधितज्ञ डी. आर.मरकड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मधील एका जुन्या गुन्हयातून डॉ. विजय मकासरे यांचे नांव वगळण्यासाठी पोलीस स्टेशन मधील पोलीसांनी लाचेची मागणी […]