भाजपचा पराभव अजितदादांमुळेच झाला असल्याचे टीकास्त्र आरएसएसच्या विवेक या साप्ताहिकामधून करण्यात आलं आहे. याआधीही RSS चे मुखपत्र ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती.
विशाळगड अतिक्रमण मोहिमेनंतर संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य संघटनेकडून 'हिंदूपदपातशाह' असा उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आलीयं.
विखे कुटुंबिय कोणाशीच प्रमाणिक नाही, असा खोचक टोला खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांना लगावलायं. सुजय विखे यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्याने लंकेंनी विखेना टोला लगावलायं.
विशाळगड अतिक्रमण प्रश्नी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी ही वेळ का आणू दिली? असा संतप्त सवाल संभाजीराज छत्रपती यांनी केलायं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विशाळगड अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पण त्यांनी लाईटली घेतलं म्हणूनच अतिक्रमण मोहिम हाती असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विशाळगडावर अतिक्रमण तोडफोड प्रकरणी खासदार शाहू महाराजांनी आज थेट गडावर जात पाहणी केलीयं. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधलायं.
विश्वासघात हे हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप असल्याचं खुद्द शंकराचार्यांनीच सांगितल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर रोख धरला. ते मुंबईत आयोजित मेळाव्यात बोलत होते.
नीट पेपर लीक घोटाळा प्रकरणात सीबीआयकडून दोन जणांना अटक करण्यात आलीयं, या दोघांवर नीट परिक्षेचे पेपर चोरल्याचा आरोप ठेवण्यात आलायं.
केंद्रात कधीही खेळ होऊ शकतो, आपलं सरकार येऊ शकतं, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलायं.
आयएएस पूजा खेडकरसह अन्य पाच आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागलीयं.