- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Pune News : ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’; पुण्यातही मराठा समाज रस्त्यावर
Pune News : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, या मागणीसाठी पुण्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात पुण्यातल मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत मराठा समाजाने आंदोलन केलं आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे […]
-
‘ओबीसी एक आग, आगीत पडूच नका’; नाना पटोलेंचा सरकारला सल्ला
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला कुणबीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत, सरकारने जरांगेंची मागणी केल्यानंतर मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या सवलती मिळणार आहेत, त्यावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला आहे. ‘ओबीसी ही […]
-
‘रोजगार पळवतायं अन् म्हणतायं शासन आपल्या दारी’; विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Vijay Wadettiwar : बेरोजगारांचे रोजगार गुजरातला पळवतायं आणि म्हणतायं शासन आपल्या दारी या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर खरमरीत टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात जाहीर सभा घेत आहेत. या सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विरोधकांवर टीकेची तोफ डागत आहेत. त्यावरुनच […]
-
गुलाबराव पाटलांना ‘जुलाबराव’ म्हणताच चिडले; मराठा आंदोलकाला केली शिवीगाळ?
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मराठा आरक्षणाच्या विषयावरून एका व्यक्तीसोबत सोबत बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी फोन करुन भूमिका मांडण्याची केली. त्यावरून वादावादी होताच मराठा आंदोलकाने गुलाबरावांचा उल्लेख गुलाबराव ऐवजी ‘जुलाबराव’ असा केला. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच चिडले असून त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकाने […]
-
2002 पर्यंत आरएसएसने तिरंगा का फडकवला नाही? मोहन भागवतांनी सांगून टाकलं…
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात तिरंगा झेंडा फडकवत नसल्याची टीका अनेकदा विरोधकांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच एका कार्यक्रमात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका तरुणाने 1950 ते 2002 पर्यंत आरएसएसच्या कार्यालयात तिरंगा का फडकवला नाही? असा थेट सवाल केल्यानंतर मोहन भागवत यांनी काँग्रेसवर जळजळीत टीका करीत प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादांनी वाद […]
-
Jalna Maratha Protest : ‘जरांगे पाटलांनी CM शिंदेंचा मान ठेवायला पाहिजे होता’; अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली नाराजी
Jalna Maratha Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान ठेवायला पाहिजे होता, या शब्दांत माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे, नवव्या दिवशीही जरांगे यांचं आमरण उपोषण सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जरांगेची मनधरणी करण्यासाठी शिष्टमंडळ […]
-
Maratha Reservation : मनोज जरांगेंनंतर कोपर्डीतही आंदोलकांची तीच भूमिका…
Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि जालन्यातील आंतरवली सराटीत झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ अहमदनगरमधील कोपर्डीमध्येही मराठा समाजाकडून उपोषण करण्यात आलं आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आला आहे. PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार […]
-
मराठा आरक्षणाचा प्रश्न फास्टट्रॅकवर: शिंदे सरकारच्या मॅरेथॉन बैठका, आणखी एका समितीची स्थापना
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश येत असल्याचं दिसून येत आहे, कारण मराठा समाजाला कुणबी दाखल्यांच्या चाचपणीसाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार असल्याचंही समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी […]
-
कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा! पहिल्या टप्प्यात 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचा निधी…
राज्य सरकारने घोषणा केल्यानूसार आज राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन […]
-
‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र
Narendra Modi : सनातन धर्माच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरली आहे. सनातन धर्माच्या वादात विरोधकांना ताकदीने युक्तिवाद करुनच प्रत्युत्तर द्यावं, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मोदींनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा सनातन धर्माच्या वादावर जोरदार प्रत्युत्तर द्यावं, असं मोदींनी सांगितलं आहे. […]









