- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Nashik Graduate Constituency : जे झालं ते पक्षीय.., अखेर बाळासाहेब थोरातांनी मौन सोडलं
मुंबई : जे काही झालं आहे ते पक्षीय राजकारण असून मी माझं मत पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलीय. बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आपले भाचे सत्यजित तांबे यांच्या विजयावर त्यांचं अभिनंदनही केलंय. थोरात म्हणाले, मी गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात होतो. माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मला कार्यकर्त्यांपासून […]
-
Gautam अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करा, मुंबईत काँग्रेसचं आंदोलन
मुंबई : उद्योजक गौतम अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या प्रमुख मागणी उद्या मुंबईत प्रदेश काँग्रेसच्यावतीने एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थिती राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवल्याचा आरोप काँग्रेसकडून […]
-
वरळीतून लढा, असं आव्हान Aaditya Thackeray यांनी देताच मुख्यमंत्र्यांची वेगळीच खेळी
मुंबई : मुंबईत उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील झाल्या आहेत. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे. प्रवेशादरम्यान त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला आहे. मी […]
-
साहित्यिकांनी निर्भीडपणे.., मंत्री Nitin Gadkari यांच्या उपस्थितीत मराठी साहित्य संमेलनाचा समारोप
वर्धा : साहित्यिकांनी निर्भीडपणे आपले विचार मांडले पाहिजे, त्यांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. गडकरी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले, साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचं काम केलं आहे. समाजाला चांगल्या दिशेने नेण्याचं काम केलंय. जे चांगलं आहे ते त्रिकालबाधित […]
-
शिवसेनेतून बाहेर गेलेले निवडणुकीत.., Ajit Pawar यांचा निशाणा
अहमदनगर : जे शिवसेनेतून बाहेर पडलेत ते निवडणुकीतून पडले असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर साधला आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज अहमदनगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघात पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. पवार पुढे बोलताना म्हणाले, 1991 साली शिवसेनेचे आमदार फुटले होते. त्यावेळी अनेक नेते शिवसेना सोडून गेले […]
-
बेताल वक्तव्यावर अनेकांची सटकते पण.., Ajit Pawar विरोधकांवर भडकले
अहमदनगर : हा महाराष्ट्र फुले-शाहु-आंबेडकरांचा ही गोष्ट आत्ताचे राज्यकर्ते आणि त्यांचे बगलबच्चे विसरले आहेत, या शेलक्या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यासाठी आले असता त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. पवार म्हणाले, सरकार येत असतं जात, असतं ही लोकशाहीची पध्दत आहे. […]
-
Ajit Pawar : लाथ मारुन पाणी काढण्याची धमक नाही.., अजित पवारांकडून विरोधकांचा समाचार
अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करीत आहेत, अद्याप त्यांच्याकडून काही होत नाहीये, आता आम्ही प्रकल्प दिल्लीवरुन घेऊन असं ते म्हणताहेत, यांच्यात लाथ मारुन पाणी काढण्याची धमक नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. अहमदनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, आत्तापर्यंत मोठ-मोठ्या नेत्यांचा काळ तुम्ही आम्ही पाहिलेला आहे, कोणाच्याच काळात असं फोडाफोडीचं […]
-
Arun Yadav : निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये वाद उफाळला, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ?
भोपाळ : मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण आणि कसा होणार? हे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ठरवलं जाणार असल्याचं मोठं विधान माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी केलंय. यादव यांच्या या विधानानंतर मध्यप्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद सुरु असल्याचं दिसून आलंय. कारण कमलनाथ यांना राज्याचा चेहरा मानून त्यांचा फोटो सध्या बॅनरवर झळकत आहे. […]
-
Nashik Graduate Constituency : तांबेंनंतर आता थोरातांची खेळी
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी सहज विजय मिळविला. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. ही निवडणूक सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यभर चर्चेत आली. काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाईचा बडगा उगारला गेला तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सत्यजीत तांबे यांच्या मामा बाळासाहेब थोरात यांच्या मौन नवी राजकीय खेळी […]
-
Amravati Graduate Constituency : भाजपला दुसरा धक्काही ‘जोर से’ : रणजीत पाटील पराभूत, लिंगाडे सव्वाशेर
अमरावतीः मागील 31 तासांपासून सुरू असलेली अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अखेर पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे रणजित पाटील (Ranjitpatil) यांना मात दिली आहे. धीरज लिंगाडे यांच्या विजयामुळे अमरावती विभागात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 3 हजार 382 मतांनी महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी […]










