- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘स्वराज्यरक्षक’ दुसरं कोणाला म्हणता येणार नाही, अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
पुणे : सध्या धर्मवीर नाव कोणीही कोणाला देतंय, तर काही जण चित्रपट काढत आहेत, धर्मवीर नाव कोणालाही देत आहेत. मात्र, स्वराज्यरक्षक दुसरं कोणाला म्हणता येणार नाही कारण, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांसारखा दुसरा कोणी होऊच शकत नसल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा […]
-
देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्यावर मोठी जबाबदारी!
मुंबई : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून देवेन भारती यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत होती. विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या नियुक्तीबाबत फडणवीस अनुकूल असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर देवेन भारती यांची नियुक्ती आता मुंबईच्या […]
-
…तर मी राजकारण सोडून देईल, अजित पवारांचं विरोधकांना इशारा
पुणे : मी जे बोललोयं ते चुकीचं असल्याचं पटवून द्या, राजकारण सोडून देणार असल्याचं चॅलेंज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांना दिलंय. मला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेते पद दिलेलं नसून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी दिल्याचं रोखठोक प्रत्युत्तरही त्यांनी दिलंय. ते पुण्यात आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मी कोणत्याही महापुरुषांबद्दल कधीच वादग्रस्त वक्तव्य […]
-
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच; अजित पवार भूमिकेवर ठाम
पुणे : मी काही इतिहास तज्ज्ञ नसून इतिहासकारांनी जे काही लिहिलंय ते मी सांगितलं, मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या विधीमंडळातील विधानावर अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेतही अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच असं संबोधलं आहे. […]
-
राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, शिष्टमंडळाची मंत्री महाजनांशी सकारत्मक चर्चा
मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांकडून पुकारण्यात आलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. बैठकीत चर्चा सकारत्मक झाल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं आहे. मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टरांकडून विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद […]
-
हद्दच झाली राव! सोलापुरात ‘गौतमी पाटील थाळी’ सुरू
सोलापूर : काही दिवसांपासून चर्चेत असलेली नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नावानं आता थाळी सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. होय खरंय, सोलापुरातील नृत्यांगना गौतमी पाटीलच्या एका चाहत्याने आपल्या हॉटेलमध्ये गौतमी पाटील थाळी सुरु केलीय. टेंभुर्णीमध्ये हॉटेल सुमनमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे. या थाळीची विशेषत: म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या हस्तेच हॉटेल […]
-
छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक का म्हणतात? छगन भुजबळांचा सवाल
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक असे का म्हणतात? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ते आज पुण्यातून बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात घमासान सुरु झालंय. विरोधकांकडून राज्यभरात आंदोलन करीत अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी […]
-
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मरक्षक? शरद पवारांनी सांगितलं
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी वावगं ठरणार नसून ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी म्हणावं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच असं विधान केलं होतं, त्यावरून राज्यात विरोधकांकडून आंदोलने सुरु आहेत. त्यानंतर आता शरद पवार […]
-
आमदार लक्ष्मण जगताप यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली
मुंबई : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिलीय. तडफदार नेतृत्व काळाने हिरावले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रध्दांजली वाहिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण-समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला, असं म्हंटलंय. तसेच आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास […]
-
अरे देवा! शंभर रुपये दिले नाही म्हणून विद्यार्थ्याचा हात कापला…
पुणे : शंभर रुपये दिले नाही म्हणून एका विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पाषाण परिसरात घडलीय. 31 डिसेंबरच्या रात्री एका हॉटेलमध्ये दोघे मित्र जेवणासाठी गेले असताना फुटपाथवर ही घटना घडलीय. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज तांबोळी असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो अहमदनगरमधील […]










