मुंबई : गेल्या काही दिवसांत विशेषतः उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शासकीय बंगला म्हणजे वर्षा निवासस्थान कायम चर्चेत राहिले आहे. राजकारणात असणाऱ्यांना वर्षा निवासस्थानाच कायम आकर्षण राहिले आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून नावारुपाला आलेला वर्षा बंगला हा पूर्वी मंत्र्यांचा बंगला होता. तो मुख्यमंत्री निवासस्थान कसा झाला? नक्की हे वर्षा निवासस्थान आहे तरी कसे? त्याचा इतिहास काय? हे पाहणं […]
मुंबई : टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहेत. याबाबत अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा आता रंगताना पाहायला […]
नवी दिल्ली : भाजप आणि संघाच्या मित्रांना मी माझे गुरू मानतो. कारण त्यांच्यामुळे राजकारण म्हणजे काय? हे समजले आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या आरएसएस आणि भाजपच्या मित्रांचे धन्यवाद. त्यांनी माझ्यावरील हल्ले असेच सुरू ठेवावे, असे प्रत्युत्तर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत भाजपला दिले आहे. माझी बदनामी करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले. याआधी मी यावर 99 […]
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दहावा (अखेरचा) दिवस होता. आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या असून, प्रकल्प मार्गी लावल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. राज्यात हे नवीन सरकार आल्यावर शेतकऱ्यांना 9559 […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतची निवडणूक होऊन आठवडा होत आला तरी तेथील राजकीय नाट्य काही थांबताना दिसत नाही. काल (गुरुवारी) उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली. यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटातील एक सदस्य फटल्याने साजन पाचपुते गटाचा उमेदवार उपसरपंच झाला. त्यामुळे नाराज झालेल्या बबनराव पाचपुतेंच्या गटातील सर्व दहा ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले […]
अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांत्वन करत श्रध्दांजली वाहिली. हिराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. हिराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. अण्णा हजारे […]
नागपूर : हिवाळी अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून […]
पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत. स्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे […]
मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच तिचा सहकलाकार शेजान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शेजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शेजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वनिता शर्मा […]
नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहेत. ‘सीबीएसई’ कडून दोन्ही बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येईल. CBSE १० वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते […]