- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Nashik : 65 हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान
नाशिक : राज्यात धुलिवंदनाचा (Dhulivandan) सण साजरा केला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पावसामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील जवळपास 65 हजार हेक्टरवरील कांदा (Onion) पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) फटका बसलाय. जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे तर धुळ्यात गारपीटीने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात […]
-
मुंबईत अवकाळी पाऊस, वातावरणात गारवा
मुंबई : मुंबईतल्या (Mumbai rain) दक्षिण भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानं वातावरणात बदल झाला. काल मध्यरात्रीपासून वातावरणात गारवा तयार झाला आहे. पण पावसाला सुरुवात होण्याआधी काल मुंबईत (Mumbai) यंदाच्या मोसमातील कमाल तापमानाची (temperature) नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा चक्क 40 अंश सेल्सियसच्या जवळ पोहोचला होता. मुंबईतल्या सांताक्रूझ हवामान केंद्रावर काल 39.3 […]
-
Beed News ‘या’कारणामुळे ‘विड्या’तील २०० जावई झाले भूमिगत!
बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावातील तब्ब्ल २०० जावई हे भूमिगत झाल्याचे समोर आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. बीड जिल्ह्यातील विडा येथे निजामाच्या काळापासून एक अनोखी परंपरा जोपसली जात आहे. त्यात धुलिवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंगळवारी (दि. ७) रोजी धुलिवंदन असल्याने जवळपास २०० जावई हे भूमिगत […]
-
Sanjay Shirsat हे असले कसले शिवसैनिक… इम्तियाज जलील यांनी उडवली खिल्ली!
संभाजीनगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर वाद थांबायचे काही नाव घेईना. रोज आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच एमआयएमचे खासदार यांनी या नामांतराविरोधात उपोषण सुरु केले आहे. त्यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आंदोलनादरम्यान औरंगजेब यांचे फोटो उंचावल्याने इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या आरोपांना प्रतिउत्तर देताना इम्तियाज जलील यांनी म्हटले की, […]
-
यात्रेत दोन गट भिडले, वाद विकोपाला
अहमदनगर : क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेली गोपाळ समाजाची मानाच्या होळी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पेटली. पोलिसांना चकवा देत गडाकडे जाणारा पारंपारिक मार्ग मानकऱ्यांनी अचानक बदलल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत मूळ मार्गाकडे वळवले. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली. होळी पेटल्यानंतर एक तासाने दोन गटात हाणामारी होऊन एका गटाने दुसऱ्या गटावर अचानक हल्ला केला. पोलिसांनी […]
-
चीन मोबाईलद्वारे करतोय जासूसी? गुप्तचर यंत्रणांचा सैनिकांना इशारा
नई दिल्ली : सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण गुप्तचर संस्थांनी चिनी मोबाईल फोन्सबाबत सल्लागार जारी केला आहे. सीमेवर तैनात असलेले सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय चिनी मोबाईल फोन वापरू नयेत याची काळजी घेण्यास गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. संरक्षण गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या सल्लागारात असे म्हटले आहे की, विविध फॉर्म आणि चॅनेलद्वारे, त्यांच्या कर्मचार्यांना अशा […]
-
Unseasonal Rain विजा, गारांसह राज्यात वादळी पाऊस!
पुणे : पुणे (Pune District) जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यासह राज्यातील अहमदनगर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद (Aurangabad), बुलढाणा आणि जालना (Jalna) या जिल्ह्यातील काही भागात पुढील तीन तास विजांचा कडकडाटा, गारांसह वादळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने (India Meteorological Department) केले आहे. […]
-
Holi Celebration : ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने शिमगा!
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावाने बोंब मारत तसेच ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत होळी सण साजरा केला. तसेच वाढत्या महागाई मुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी यावेळी घरगुती गॅस सिलिंडरची (Gas Cylinder) प्रतिकृती तयार करून ती […]
-
मानाची काठी कळसाला भेटवून मढी यात्रेला सुरुवात
अहमदनगर : कानिफनाथ महाराज की जय,असा जयघोष करत कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला व समाधीला भेटून श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा यात्रा उत्सवाची आजपासून सुरुवात झाली. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालते. धार्मिक परंपरेनुसार वारी रविवारी (ता.५) रात्री पाथर्डी शहरातून वाजतगाजत मानाच्या काठीची मिरवणूक निघाली. डफांचा पारंपारिक तालात मिरवणूक’ रात्रभर मिरवत सकाळी मढीला आली. ग्रामप्रदक्षिणा […]
-
माणिक साहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय
अगरतळा : त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. पक्षाने माणिक साहा यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. बुधवार, 8 मार्च रोजी मुख्यमंत्री आणि नवनिर्मित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित […]









