अजितदादांची शेतकऱ्यांना गुडन्यूज; कृषिपंपांचे थकीत वीजबिल माफ

अजितदादांची शेतकऱ्यांना गुडन्यूज; कृषिपंपांचे थकीत वीजबिल माफ

Maharashtra Assembly Session Live : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज अर्थमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) राज्याचा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात (Maharashtra Assembly Session) त्यांनी राज्यातील कृषी क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. काही नव्या योजनांचीही सुरुवात केली जाणार आहे. तसेच अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना गुडन्यूज देत कृषिपंपांची थकीत वीज बिलं माफ करणार असल्याची मोठी घोषणा केली. या मोठ्या घोषणेसह अन्य महत्वाच्या योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी, देहू आळंदी पंढरपूर मार्गावरील वारकरऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार आहे.  प्रतिदिंडी 20 हजार रुपये निधी देणार आहोत. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, बस प्रवासात सवलत, शक्ती सदन योजना अशा योजनांची अंमलबजावणी सरकारकडून केली जात असल्याचे अजित पवार म्हणाले.

Maharashtra Budget : महिलांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा, अनेक नव्या योजना सुरू करणार

१० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत करणार. सरकारी रूग्णालयात गर्भाशय कर्करोगाची तपासणी केली जाणार. प्रत्येक मुलीला महिन्याला दीड हजार रूपये मिळणार. लाडकी बहिण योजनांसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी निधी दिला जाईल असे स्पष्ट करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या नव्या योजनेची घोषणा केली.

दुधासाठी पाच रुपये अनुदान सुरुच राहणार

दुधासाठी प्रति लीटर पाच रुपये अनुदानाची योजना पुढे सुरु ठेवली जाणार आहे. शेळी मेंढी व कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास भरपाई 20 लाखांवरून 25 लाख करण्यात येत आहे. पशुधनाच्या नुकसान भरपाईतही वाढ केली जाणार आहे.

जयंतराव आपल्यावेळी प्रकरण पुढं सरकायचंच नाही

उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. यासाठी चार हजार कोटी खर्च येणार असून त्याची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी 650 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातल्या 108 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप आठ लाख शेतकऱ्यांना देणार आहेत असे स्पष्ट करत जयंतराव आपल्यावेळी तर प्रकरण पुढं सरकायचंच नाही, अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी जयंत पाटील यांना उद्देशून केली.

अजितदादांची शेतकऱ्यांना गुडन्यूज; कृषिपंपांचे थकीत वीजबिल माफीची घोषणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज