नाशिक : कांद्याच्या दरात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे आज शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडला होता. मात्र आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मध्यस्थी केली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने आजपासून (28 फेब्रुवारी) पुन्हा लासलगाव (Lasalgaon) […]
Ahmednagar News : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर (Ahmednagar) शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसा हा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चिला जात आहे. मात्र, सरकारने दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर नगरच्या नामांतराची चर्चा होत आहे. यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]
अहमदगनर : शेवगाव (Shevgaoun)तालुक्यातील गंगामाई शुगर इंडस्ट्रीजच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी आग लागल्याचं समोर आलंय. यावेळी तेथे 32 कर्मचारी कार्यरत होते. त्यातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी असून उर्वरित 30 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती गंगामाई साखर कारखान्याचे (Gangamai Sugar Factory)अध्यक्ष रणजीत मुळे (Ranjit Mule)यांनी दिलीय. सविस्तर माहिती अशी की, […]
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोठी आग लागली आहे. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीने रौद्ररुप घेतले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात […]
नाशिक – कोणत्याही शहराचे नाव बदल्याने विकास होत नाही. पण या दोन्ही शहरांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी भाग आहे तिथं पाण्याचे स्त्रोत तयार केल्यास त्या भागाचा विकास होईल. औरंगाबाद शहरात देखील चांगली विकासकामे सुरु आहेत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. रामदास आठवले नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. पुढे […]
जळगाव : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनतेने धडा शिकवला असा दावा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो. यासाठी नारायण राणे आणि छगन भुजबळ यांचा दाखला दिला जातो. काल पुण्यात अजित पवार यांनी देखील हाच दावा केला. उध्दव […]