Sharad Pawar यांच्याकडून फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाखाली जातिवाद अन् विश्वासघात; देवधरांचा निशाणा

Sharad Pawar यांच्याकडून फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाखाली जातिवाद अन् विश्वासघात; देवधरांचा निशाणा

Sharad Pawar : लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्याप्रमाणेच जातिवाद महाराष्ट्रात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून केला जातो. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्याकडून ओबीसी आणि मराठ्यांचा देखील विश्वासघात शरद पवार कार्य करत आले आहेत. हे केवळ ते काही लोकांना खुश ठेवण्यासाठी करतात. अशी टीका भाजपचे नेते सुनील देवधर (sunil deodhar ) यांनी केली ते अहमदनगरमध्ये भारत भारतीच्या राम मंदिर से रामराज्य या कार्यक्रमात बोलत होते. बोलत होते.

लालू यादवांच्या स्वप्नांना सुरुंग : काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या संपर्कात, रात्रीत खेळ बिघडणार?

यावेळी बोलताना सुनील देवधर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, कश्मीरचा प्रश्न असो वा पूर्वेकडील राज्यांचे प्रश्न असो या सर्वांना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत. त्यांचे शिक्षणही परदेशात झालं होतं. त्यामुळेच त्यांच्यामध्ये भारताबद्दल प्रेम नव्हतं. भारत चीन युद्ध झालं त्यावेळी देखील पंडित जवाहरलाल नेहरूंनी आसाम राज्याला युद्धात मारण्यासाठी सोडून दिला होता. भारतीय सैन्य पाठवण्यात आलं नव्हतं. कारण त्यांच्या काळात संरक्षण करण्यासाठी कोणतेही शस्त्र निर्मितीच केली जात नव्हती. कारण त्यांना कुठल्याही देशावरती आक्रमण करायचं नव्हतं किंवा कुठलाही देश त्यांच्यावर आक्रमण करणार नाही. असा त्यांचा समज होता.

Coal and Liquor Scam प्रकरणी 100 हून अधिक एफआयआर, माजी मुख्यमंत्री बघेल यांचा भाजपवर हल्ला

त्याचबरोबर यावेळी त्यांनी कम्युनिस्टांवर देखील चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले कम्युनिस्टांकडून भारताच्या महापुरुषांबद्दल चुकीची माहिती देत लोकांना देत असल्याचा आरोप केला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कम्युनिस्टांवर कधीही विश्वास ठेवला नाही आणि कम्युनिस्टांप्रमाणेच देशाला नुकसान पोहोचण्याचं काम गांधी परिवाराने केल्याचा आरोप देखील यावेळी देवधर यांनी केला. तसेच यावेळी देवधर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील मुस्लिमांना दिले जाणारे जास्तीचे महत्व यावर देखील टीका केली.

Donald Trump : लेखिकेचे लैंगिक शोषण प्रकरणी ट्रम्प यांची साक्ष, बायडन सरकारवर गंभीर आरोप

त्याचबरोबर राम मंदिर आणि बाबरी मशीद निर्माण यावरून ज्याप्रमाणे आता राम मंदिर प्रांत प्रतिष्ठान सोहळ्याचा निमंत्रण राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी नाकारले. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी मशीद हटवून मंदिर बनवतात. त्याचं निमंत्रण नेहरूंना दिलं होतं. ते देखील नेहरूंनी नाकारलं होतं. त्यामुळे गांधी परिवार हा पूर्वीपासूनच मुस्लिमांना जवळ करणारा आणि हिंदू विरोधी आहे. अशी टीका देवधर यांनी केली.

राम मंदिर आंदोलनाच्या दरम्यान काढलेला रथयात्रेला विरोध करणारे लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव हे केवळ जातिवाद करत सत्तेत राहण्यासाठी धडपडत होते. ज्याप्रमाणे हे दोघे जातिवाद करत होते. तसाच जातीवाद महाराष्ट्रात शरद पवार यांच्याकडून केला जातो. फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्याकडून ओबीसी आणि मराठ्यांचा देखील विश्वासघात शरद पवार कार्य करत आले आहेत. हे केवळ ते काही लोकांना खुश ठेवण्यासाठी करतात. अशी टीका शरद पवारांवर भाजपच्या सुनिल देवधर यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube