उद्धवजींचे चालणार नाही नखरे, आमच्यासोबत राज ठाकरे; आठवलेंची खास कविता स्टाईल टीका

उद्धवजींचे चालणार नाही नखरे, आमच्यासोबत राज ठाकरे; आठवलेंची खास कविता स्टाईल टीका

Ramdas Aathavale Criticize Uddhav Thackeray in PM Modi meeting : राज्यामध्ये लोकसभेच्या ( Lok Sabha Election ) चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा सध्या रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले ( Ramdas Aathavale ) यांनी आपल्या खास कवितेच्या स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

पोटात लाथा मारल्या, माझी मासिक पाळी सुरू होती; मालिवाल यांचा FIR’मध्ये दावा

यावेळी बोलताना आठवलेंनी खास चारोळ्या म्हणत टीका केली. ते म्हणाले की, उद्धवजी आता महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्या सोबत आले आहेत राज ठाकरे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे, मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे. अशी कविता म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. तर सध्या राज्य आणि देशांमध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे आणि मी स्वतः हे संविधानाला बळकट करत आहेत. त्यामुळे उद्धवजी तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला पण चार तारखेला आम्ही तुम्हाला देणार आहोत टोला. असा टोला देखील आठवले यांनी आपल्या कवितेतून उद्धव यांना लगावला.

‘मोदीजी हिम्मत असेल तर डोळ्यात डोळा टाकून निवडणूक लढा’ केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा

तर पुढे बोलताना आठवले म्हणाले की, निवडणुका आल्या की, विरोधकांकडून संविधान धोक्यात असल्याच्या घोषणा दिल्या जातात. मात्र संविधान धोक्यात नसून महाविकास आघाडी खोक्यात आहे. बाळासाहेबांसोबत मी शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग केला होता. मात्र आता इंडिया आघाडीचा प्रयोग केला जातो. तसेच नरेंद्र मोदी आहेत, या देशांमध्ये घोंगावणारं तुफान, पण राहुल गांधी तुम्ही राजकारणात करत आहात घाण, नरेंद्र मोदी वाढवत आहेत. बाबासाहेबांच्या संविधानाची शान पण इंडिया आघाडी वालो बहिरे झाले आहेत तुमचे कान कारण त्यांचे नाही विकासाकडे ध्यान, मग का होणार नाही? त्यांचे बधिर कान, आम्हाला वाढवायचाय महाराष्ट्राचा मान, वेळ आली तर शिवराय अन् भिमरायांसाठी देऊ आम्ही जान.

माझा रिपब्लिकन पक्ष आणि भीमशक्ती मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आणि महायुतीला पाठिंबा देण्यासाठी माझा वस्ती वस्तीतला माणूस आहे. एकत्र आला आहे भगवा आणि निळा त्यामुळे त्यांच्या पोटात उठला आहे गोळा. तसेच उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हायचं असं म्हणत आहेत. पण तिकडे जाऊन ते पंतप्रधान कसे होणार? तसेच इंडिया गाडीच्या प्रत्येक मित्राला पंतप्रधान व्हायचंय. पण मोदी आहेत तोपर्यंत तुम्ही पंतप्रधान होऊ शकत नाही. असं म्हणत संपूर्ण भाषणात आठवले यांनी आपल्या कवितेतून उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज