सत्यजित तांबेंचं बोलणं बालिशपणाचं…; बाळासाहेब थोरातांनी टोचले कान

सत्यजित तांबेंचं बोलणं बालिशपणाचं…; बाळासाहेब थोरातांनी टोचले कान

Balasaheb Thorat : आमदार सत्यजित तांबे यांनी (Satyajit Tambe) काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका केली होती. राहुल गांधी हे अॅक्सेसेबल नाहीत. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉंग्रेस नेत्याने एक तासांच्या आत राहुल गांधींची भेट घेऊन दाखवावी, असं थेट आव्हान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता त्यांचे मामा आणि कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) भाष्य केलं.

सत्यजित तांबेंचं बोलणं हे बालिश बोलणं आहे. त्यांना अनेक गोष्टी शिकाव्या लागणार आहेत, असं थोरात म्हणाले.

Nilesh Lanke : रेल्वे लाईन, मेडिकल कॉलेज अन् तुटपूंजा खासदार निधी; लकेंची सडेतोड उत्तरं 

बाळासाहेब थोरातांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. सत्यजित तांबेच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, सत्यजित तांबे बोलले हे खरं आहे. त्याचं हे बोलणं बालिश बोलणं आहे. ते आता आमदार आहे. पण, त्यांना आणखी काही गोष्टी शिकाव्या लागतील. तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही बोलू शकता. पण, काय मांडावं, बोलावं अन् काय नाही, हे त्यांना शिकावं लागेल. माझं त्यांना सांगण आहे की, आपल्या जीवनामध्ये ज्यांनी आपल्यासाठी काही केलं असतं, त्यांचे ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजेत. इतराना आत्मचिंतनाचे सल्ला देण्याऐवजी त्यांनी स्वत:चे आत्मचिंतन करावे, अशा शब्दात थोरातांनी तांबेंचे कान टोचले.

मंत्री संजय शिरसाटांचा विट्स हॉटेल खरेदीबद्दल मोठा निर्णय; वाचा, कुठं अन् कसं आहे हे हॉटेलं? 

मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल बोलताना थोरात म्हणाले की, मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीमालाचे मोठं नुकसान झालं. फळबागांचे नुकसान झालं. केळी, संत्री, डाळींब, आंबा या पिकांना पावसाचा तडाखा बसला. त्यामुळं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं. लागवड खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती आहे.मात्र, प्रशासनाने कुठलाही मदतीची घोषणा केली नाही. सरकार म्हणून तुम्ही पंचनामे कसे आणि कधी करणार?, असा सवाल थोरातांनी केला.

राज्यात शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालं. मात्र, फिल्डवर प्रशासन, प्रशासनाताले अधिकारी, पालकमंत्री फिरकत नाहीत. पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना तातडीने काहीतरी दिलासा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत न करता हेक्टरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत जाहीर करा, अशी मागणी थोरातांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube