शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जाचा पुरवठा करावा. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शेतीपूरक व्यवसाय, कृषी पर्यटनावर भर […]
CM Eknatha Shinde : कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण पथके, भरारी पथके कार्यान्वित करावीत. लिंकेजच्या तक्रारी आल्या, तर तातडीने कारवाई करावी. शेतकऱ्यांसाठी पुरेसे बि- बियाणे, खतांचा साठा उपलब्ध असून ते वेळेत मिळतील, अशी दक्षता कृषी विभागाने घ्यावी. यंदाच्या मॉन्सूनवर एल- निनोचा प्रभाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पुरेसा पाऊस […]
Eknath Shinde : केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाच्या विरोधात पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभर फिरत आहेत. केजरीवालांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेली त्यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही होते. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या भेटीवर खोचक […]
Pravin Gaikwad on SambhajiRaje Chhatrapati : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वराज्य नावाचा पक्ष स्थापन केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्ष विस्तारासाठी राज्याचा दौरा देखील केला होता. राष्ट्रवादी ते राष्ट्रपती नियुक्त खासदार असा प्रवास केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना राजकारणात अजूनही संघर्ष करावा लागतो आहे. भाजपची खासदारकी स्विकारल्याने संभाजीराजेंची विश्वासार्हता संपली आहे का? असा […]
जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. त्या अनुषंगाने राज्यसरकार कामाला लागले आहे. आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना शालेय गणवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले कुणालाही गणवेश विकत घ्यावा लागणार नाही. सर्व शाळांना एकच गणवेश असावा अशी शासनाची भूमिका आहे. परंतु काही समित्यांनी गणवेश घेतल्याने यंदा सर्वांना सारखे गणवेश असू शकत नाहीत असे […]
नगरकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षीत अमृत पाणी योजनेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. येत्या आठ दिवसांत अमृत योजनेचे पाणी नगरकरांना मिळणार आहे. अहमदनगर महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी हे जाहीर केले आहे. BCCI चा प्लेऑफसाठी नवा उपक्रम, डॉट बॉल टाकल्यास… करावे लागणार ‘हे’ काम नगरकरांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अमृत पाणी योजना […]