- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
Ajit Pawar यांनी बैठक घेतली आणि विखेंनी दाखवला इंगा!
नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील सर्व संचालकांना विश्वासात न घेता सहकारमध्ये राजकीय रंग देण्याचा विराेधकांचा डाव हाणून पाडण्यासाठी नाईलाजाने निवडणूक लढवावी लागली. विराेधी पक्षनेत्यांनी भाजप (BJP) संचालकांना डावलून बैठक घेतल्याने विराेधकांना जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने संचालकांनी आरसा दाखवला आहे, असा टाेला खासदार डाॅ. सुजय विखे-पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी लगावला. तर दुसरीकडे राज्याचे […]
Ajit Pawar : सरकारची धुळवड झाली असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी
मुंबई : राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. आंबा, हरभरा, गहू, कांदा, संत्रा, मका, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने अधिवेशनात (Budget session) केली जाईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. 6 मार्च ते 9 मार्च […]
Ajit Pawar : ‘सावित्रीबाई-अहिल्याबाईंच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री नाही हे लाजीरवाणं’
अहमदनगर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री नाही, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Leader of Opposition Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अजित पवार हे आज पाथर्डी (Pathardi) येथे आले असता त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथे एका जाहीर सभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी पवारांनी चौफेर […]
Ajit Pawar : आमच्यात काय जोम नाही का, आम्ही डबल जोमाने निवडणूक लढवू!
पाथर्डी : महाविकास आघाडीने (MVA) एकदिलाने काम केल्याने कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) भाजपचा उमेदवार पडला. ते भाजपला इतके जिव्हारी लागले आहे की ते म्हणतात आम्ही जोमाने काम करू, असे भाजपचे (BJP) नेते म्हणत आहे. मग आम्ही काय गप्प बसणार आहे का, जोम काय फक्त तुमच्यात आहे का, आम्ही पण डबल जोमाने काम करू आणि येणाऱ्या […]
Ajit Pawar : शिंदे-फडणवीसाकडून फक्त सरकार टिकवण्यासाठी धडपड!
पाथर्डी : एका-एका मंत्र्याकडे ६-६ जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. लोकांची कामं कशी होणार आहे. शिंदे गटातील ४० आमदारांना तुला मंत्री करतो म्हणून केवळ आश्वासन दिले जात आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadanvis) सरकारमधील आमदार अश्वस्त आहेत. तर शिंदे-फडणवीस यांच्याकडून केवळ सरकार टिकवण्यासाठी धडपड सुरु आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit […]
Ajit Pawar : ‘सरकार झोपा काढत आहे का?’, पेपर फुटीवरुन अजितदादा विधानसभेत संतापले
मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा पेपर फुटीची घटना घडली आहे. बुलढाणा (Buladhana ) जिल्ह्यामध्ये आज बारावीचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच राज्याच्या माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीच्या मुद्द्यावरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत. आज बारावीचा गणिताचा पेपर […]
Ajit Pawar : ‘आश्वासन दिलेल्या बैठका तरी घ्या’, विधानसभेत अजितदादांनी मंत्र्यांना खडसावले
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. पण सभागृहातील कामकाज व्यवस्थित न चालल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मंत्र्यांनी नियोजित केलेल्या बैठका आता तरी वेळेवर घ्याव्यात, या मुद्द्यावरुन मंत्र्यांना धारेवर धरले आहे. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन […]
Ajit Pawar यांनी ‘त्या’ अजब आदेशावरुन शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले
मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारने एक अजब आदेश या सरकारने काढला. हा आदेश सरकारला का काढावा लागला, हे अजूनही कुणाला कळले नाही. आपली जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याची ही वृत्ती आहे का, असे अनेक प्रश्न आज जनतेला पडले आहेत. “लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या अर्जावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लिहिलेले शेरे कोणत्याही परिस्थितीत अंतिम समजण्यात येऊ नयेत”, असा आदेश सामान्य […]
Ajit Pawar शिंदे-फडणवीस सरकारमुळे मराठीभाषकांवर अन्याय!
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सीमावर्ती भागातील मराठीभाषकांवर अन्याय वाढला आहे. महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा करत आहेत. मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारचा अन्याय सुरु आहे. मराठी माणसांवर गुन्हे दाखल होत आहे. तुरुंगात टाकले जात आहे. मराठी भाषेची गळचेपी सुरु आहे. हे सारं अचानक का वाढलं, असा प्रश्न जनतेला पडला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर […]
Ajit Pawar म्हणाले… दळभद्री गाडीवर प्रसिध्दीसाठी सरकारने ५० कोटींचा चुराडा केला
मुंबई : आठ महिन्यांत जाहीरातींवर सरकारकडून ५० कोटीं आणि मुंबई महापालिकेकडून १७ कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न गंभीर आहे. पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबं उपासमारीचा सामना करत असताना, राज्य शासन मात्र एसटीचे कोट्यवधी रुपये खर्चून पानभर जाहिराती प्रसिद्ध करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हसऱ्या चेहऱ्याच्या दैनिकांच्या पहिल्या पानावरच्या या पानभर जाहिराती चीड […]
