मुंबई- समृद्धी महामार्गानंतर (Samruddhi Mahamarg) आता राज्यात आणखी एक परिवहन क्रांती होणार आहे. समृद्धीनंतर आता राज्यातल्या शक्तिपीठांना जोडणारा 760 किलोमीटरचा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग (Shaktipeeth Mahamarg)बांधला जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) प्रस्तावित केलेला हा महामार्ग 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गाने रेणुका माता (Renuka Mata), तुळजाभवानी (Tuljabhavani) आणि महालक्ष्मी (Mahalaxmi) या शक्तिपीठांना जोडले जाणार […]
शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोयाबीन (soybean) आणि कापसाच्या (cotton) प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकार सरकार गंभीर नाही. सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत पिकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे. रविकांत तुपकर […]
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll) काँग्रेसचे (BJP) उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ११ कोटी ४ लाख ४७ हजार ९७८ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ९४ हजार ८०७ रुपये इतकी तसेच २ कोटी २२ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सोने आहे. तसेच त्यांचे पती […]
वैभव नाईकांमागोमाग (Vaibhav Naik) शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे गेल्या काही दिवसांपासून एसीबीच्या रडारवर आले आहेत. राजन साळवी रायगड एसीबीच्या (ACB ) चौकशीमुळे चर्चेत आले असून, त्यांच्याभोवती चौकशीचा फास आवळला जात असल्याचं दिसत आहे. कारण आता एसीबीने जिल्हाधिका इतकंच नाही, तर शिवसेनेच्या (Shiv Sena) विधानसभेच्या संभाव्य उमेदवाराला देखील नोटीस आल्यानं वेगवेगळ्या […]
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये लव्ह जिहाद आणि मुलींच्या अपहरणाच्या घटना समोर आल्या होत्या. याबाबत विचारले असता आमदार लहू कानडेंनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
“मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.” असा इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरु झाला आहे. त्यावर संभाजी राजे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी राजे यांनी एक ट्विट करून म्हटले आहे की, “जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट […]
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल (Governor of Maharashtra) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राज्यपाल पदावरुन गच्छंती होण्याची गेल्या अनेक दिवसांपासून शक्यता आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे विरोधक त्यांच्या राजीनाम्यासाठी चांगलचे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. आता […]
मुंबई : कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात नाही, त्यांच्याशी काही बोलणं देखील झालं नाही. त्यांनी राजीनामा दिला की नाही, याबद्दल मी काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]
मुंबई : दोन आठवड्यापूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून अदानी ग्रुप मोठ्या अडचणींना सामोरे जात आहे. बाजारात मोठी घसरण झाली असल्यामुळे अदानी ग्रुपला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या अहवालामुळे अदानी ग्रुपवर अनेक प्रश्नही उभे केले जात आहेत. असे असताना महाराष्ट्र राज्य सरकारने मात्र गौतम अदानी यांच्या पुत्राला राज्याच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर सदस्य म्हणून घेतलं […]
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार २०१९ पासून ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsinh Koshyari) यांच्यात विळ्या भोपळ्याचं नातं असल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या ६ महिन्यात ठाकरे सरकार कोसळल्यावर राज्यात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात कायम वाद चालूच असल्याचं दिसत […]