उद्धव ठाकरेंची टीका म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार; फडणवीसांचे टीकास्त्र

उद्धव ठाकरेंची टीका म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार; फडणवीसांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : काल विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका केली होती. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे, सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार आहे, असं फडणवीस म्हणाले.

Imran Khan: इम्रान खान 9 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक; गोव्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात 

देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेकविषयांवर भाष्य केलं. ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याची गरज आम्हाला नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला विकास सारा देश पाहत आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यात केलेलं एक तरी विकास दाखवावं. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे अडीच वर्षे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही केले नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार आहे, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलं.

‘या’ कारणामुळे भारत दौरा रद्द करणारे Elon Musk पोहचले चीनला 

संजय राऊत कोण आहे, हे माहिती नाही. पण, उद्धव ठाकरेंनी ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, आम्ही रामाचं नाव घेतो, याचा ठाकरेंच्या शिवसेनेला राग का येतो? भारतात राम-राम करायचे नाही तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे? आम्ही राम-राम म्हणणारच असंही देवेंद्र फडणवीस यांनीही ठणकावून सांगितलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रद्वेषी आहेत. महाराष्ट्रद्वेषापोटी ते संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. . मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे. मोदी काहीही बोलतील, पण 2014 आणि 2019 च्या वेळी असलेला आत्मविश्वास मला आता दिसत नाही. 56 इंचाची छाती होती, आता त्यातली हवा गेली. कारण आजूबाजूचे सगळेच भ्रष्टाचारी अशी गत झाली. आता अटलबिहारी वाजपेयींचा आत्मा ढसाढसा रडत असेल, अशी टीका ठाकरेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube