Navneet Rana : हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा करताच मला घरातून फरफटत नेऊन 14 दिवस तुरुंगात आणि 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवल्याचं सांगत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या अविश्वास ठरावावर चर्चेदरम्यान नवनीत राणा सभागृहात बोलत होत्या. अनिल […]
धुळेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवारांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. तर काही माजी आमदार, पदाधिकारी ही अजित पवारांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. त्यामुळे गोटेही शरद पवारांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. धुळ्यातील […]
Prakash Ambedkar News : काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा खासदाराकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिसून आले आहेत. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने महत्वपूर्ण विधेयके मंजूर केली आहेत. केंद्र सरकारच्या विधेयक मंजूरीसह इतर मुद्द्यांवर बोट ठेवत वंचितचे प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी […]
भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवरती चाचपणी सुरु केली आहे. काँग्रेसकडून आज (8 ऑगस्ट) 48 जागांवरती निरीक्षक आणि समन्वयकांची नेमणूक करण्यात आली. राज्यातील 23 प्रमुख नेत्यांवर 48 मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सरासरी प्रत्येक नेत्याला दोन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Congress appointed observers and coordinators for 48 Lok Sabha seats) […]
Sudhir Mungantiwar Viral clip : राज्यात मागील काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांच्या वाढीव शुल्कांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरलं होतं. तलाठी परीक्षेसाठी तब्बल १ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी प्रश्न विचारले होते. त्यावर परीक्षांचे गांभीर्य रहावे म्हणून शुल्क वाढविले असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री […]
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गचं काम गेल्या 13 वर्षांपासून पूर्ण होण्याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या महामार्गाचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मार्गाची पाहणी देखील केली होती. त्यात आता हा महामार्ग कधी पूर्ण होणार? याची डेडलाईन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. […]