- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची महिन्याभरात बदली, आता पशुसंवर्धनची जबाबदारी
IAS Tukaram Mundhe Transfer : सरकारमध्ये अजित पवार गट आल्यानंतर या गटातील आठ आमदारांना महत्त्वाचे खाते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, झेडपीचे सीईओ बदलण्यात आले आहेत. त्यात सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची पुन्हा […]
-
सहकाऱ्यांचे हात धरले,अर्धा डोंगर चढला अन्…; CM शिंदेंनी सांगितला इर्शाळगडावरील ‘आँखो देखा हाल’
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळ्याने मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री 11.35 ला याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ बचाव कार्य सुरु झाले. अतिशय दुर्गम भाग होता, पाऊस होता, वादळ वारा होता, अशी परिस्थित रात्री 12.40 च्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळी जावान पोहचले. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या संपर्कात होतो. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार […]
-
Maharashtra Council : उत्तर देण्यासाठी मुनगंटीवार परबांच्या घरी जाणार; वाचा खारघर घटनेवरून काय झालं?
Maharashtra Assembly Session : खारघरच्या इव्हेंटचे कंत्राट दिलेल्या कंपनीने करारातील अटी व नियमांचे उल्लंघन केले आहे का? त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे का? असा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. यावरुन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार अनिल परब यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात खारघर घटनेचा मुद्दा उपस्थित […]
-
Aditya Thackery : पालिकेच्या केबिन मंत्र्यांना बिल्डिंग उभारण्यासाठी देत आहात का? आदित्य ठाकरेंचा सवाल
Aditya Thackery : मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महानगर पालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे भडकले आहेत. धक्कादायक बातमी अशी आहे की, मुंबई महानगर पालिकेमध्ये दोन केबिन पालकमंत्र्यांना दिली आहेत. केबिन देण्याची गरज का पडली. ही प्रथा चुकीची आहे. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ( Aditya Thackery Criticize Mangalprabhat […]
-
महिलांवर अत्याचार करणारे हे मोदी सरकार आहे का? विद्या चव्हाणांचा सवाल
मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्याचे क्रूर कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मणिपूर मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे मात्र याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. महिलांविरोधात देशातील मोदी सरकार सुरक्षा देण्यात आणि रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे. तसेच देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराची […]
-
पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले…
Manipur Violence : देशभरात मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरुन सर्वच स्तरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी फक्त निषेधच नाहीतर कृती करावी, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तूटणार असल्याचं भाकीत केलं आहे. यासंदर्भात राज ठाकरेंनी ट्विट केलं आहे. कालपासून मणिपूर […]










