मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून असून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. एकीकडे शिंदेगट बँड-बाजासह आपला विजय साजरा करत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर टीका केली […]
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना पक्ष (Shivsena) व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना चोर म्हटले आहे. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही धनुष्यबाण काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता. तो मी सोडविला आहे. तुम्ही […]
अहमदनगर : निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. कारण, आज शिवसेना (Shiv Sena हे चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेत ते एकनाथ शिंदे आणि गटाकडे सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. थोरात म्हणाले, निवडणूक […]
मुंबई : शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने आज दिला. मात्र आयोगाच्या निकालपत्रातून अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच मूळची शिवसेना असल्याचे आयोगाने नमूद करताना पक्षात लोकशाही नसून नक्की बहुमत कोणाकडे आहे, हे दोन्ही गटांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांतून स्पष्ट होत नसल्याने आमदार आणि खासदार यांच्या संख्येनुसारच हा निर्णय घेतल्याचे आयोगाने म्हटले आहे. […]
मुंबई : ‘बाळासाहेबांचे विचार त्यांना कधी समजलेच नाही. कारण बाळासाहेबांनी कधीच कुणाचे गुलाम व्हा हा विचार दिला नव्हता. त्यांनी अन्यायाशी लढा अन्यायावर लाथ मारा असे शिकवण दिली. मी ती त्यावेळी मारली त्यामुळे आम्ही अंधेरीची पोट निवडणूक जिंकली. ती तुम्ही का लढवली नाही. दुसऱ्यांचा नेता चोरायचा दुसऱ्यांचे विचार चोरल्यासारखं दाखवायचं दुसऱ्याच चिन्ह चोरायचं आणि जिंकलो की […]
पुणे : देशातील लोकशाही संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आता देशात हुकूमशाहीची सुरुवात झाली आहे, असे जाहीर करावे. आज केंद्रीय निवडणूक (Central Election Commission) आयोगाने शेण खाल्लं आहे. दहशत, पैशाच्या जोरावर निर्णय द्यायचा होता तर मग आम्हाला पुरावे का मागितले. आधीच निर्णय द्यायचा होता. एवढा खटाटोप करण्याची काहीच गरज नाही. […]