शिलॉग : कॉनराड संगमा (Conrad Sangma) यांनी आज दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची (Meghalaya CM) शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. राज्यपाल फागू चौहान यांनी संगमा यांच्यासह 12 मंत्र्यांना शपथ दिली. एनपीपीचे स्नियावभालंग धर आणि प्रेस्टन टेन्सॉंग यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपचे अलेक्झांडर लालू हेक यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात […]
H3N2 : बदलत्या ऋतूमध्ये भारतातील सर्व भागांमध्ये इन्फ्लूएंझा सारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. हा विषाणू फ्लू किंवा कोविड-19 नाही. पण इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) असलेल्या रुग्णांपैकी निम्मे रुग्ण इन्फ्लूएंझा H3N2 ग्रस्त आहेत. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद […]
पुणे : कसबा( Kasaba ) पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवजणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देखील धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली […]
कांद्याचे दर कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. शेतकऱ्यांना कवडीमोल दरात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे सरकाराला जाग यावी यासाठी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे कांदा पाठवला आहे. तर गळ्यात कांद्याचे हार घालून शेतकऱ्यांनी ही गांधीगिरी पद्धतीने सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील राजेंद्र चव्हाण यांनी […]
अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अहमदनगर येथे केले आहे. सध्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. चार दिवसांच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा अधिवेशनाला सुरुवात होतीय. […]
गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरावरून वाद पेटला असताना आता धाराशिवमध्येही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर केल्याच्या निषेधार्थ एमआयएमने 8 मार्चपासून धाराशिव येथे साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. नामांतराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर नंतर धाराशिव येथे MIM आमरण उपोषण करणार असल्याने नामांतरला […]
पुणे : कसबा( Kasaba ) पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देखील धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली […]
नवी दिल्ली : लंडनला गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने मोदी सरकारवर (Modi government) हल्लाबोल करत आहेत. संसदेतील विरोधी पक्षाच्या नेत्यांचे बोलणे बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसची (Congress) वेळ संपली आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असेही ते म्हणाले. भाजप नेहमी सत्तेत राहील असे वाटते पण तसे नाही. भाजपने काँग्रेसवर जोरदार […]
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत दारुमाफियांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर हल्ला झाला होता, असा खुलासा काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. मागील आठवड्यात विधानसभेत त्यांनी हा आरोप केला होता. विधानसभेत आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या, हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे करणाऱ्याचा जरब वाढलाय, कारण त्यांना सत्ताधारी नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप […]
“मागच्या ४०० वर्षांच्या काळात समाजात बदल घडवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं आहे. त्या वर्षांत तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात संत तुकाराम महाराजांचा इतिहास दूरचित्रवाणीद्वारे पोहचवला जाणार आहे.” अशी माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. देहू (Dehu) येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रणावरील दिनदर्शिकेच्या अनावरण सोहळ्यास शरद पवार उपस्थित […]