“रात्री इंग्रजी पितात अन् निवडणुकीच्या वेळी यांचं मराठीप्रेम जागतं”, भाजप आमदाराची ठाकरेंवर सडकून टीका

Parinay Fuke on Thackeray Morcha : राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष (Hindi Language Controversy) एक होताना दिसत आहे. उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होत आहे. ठाकरे बंधूंनीही मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला पाठिंबाही मिळत आहे. यातच सत्ताधारी गटात अस्वस्थता वाढू लागली आहे. सत्ताधारी गटातील नेते विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. भाजप नेते परिणय फुके यांनी (Parinay Fuke) ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका केली आहे. ‘म’ मराठीचा की महापालिकेचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील शाळांत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे. येत्या 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू मुंबईत मोर्चा काढणार आहेत. अधिवेशनही सुरू होत आहे. त्यामुळे सरकारची कोंडी होऊ लागली आहे. याच मुद्द्यावर फुके यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
फुके म्हणाले, ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्यासाठी यांचं मराठीप्रेम जागृत होतं. दोन्ही ठाकरे बंधुंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहेत. दोन्ही भाऊ एकत्र येऊन काहीही होत नाही. दोन भावजया एकत्र आल्या पाहिजेत तरच काहीतरी होऊ शकेल असा टोलाही त्यांनी लगावला.
नारायण राणेंबद्दल विधान! फडणवीससाहेब, भरत गोगावलेंची चौकशी करा; ठाकरेंनी ठेवलं बोट
ज्यांना भाजपने मांडीवर घेतलं ती खरी शिवसेना नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लगावला होता. यावरही फुके यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंना भाजपाच्या मांडीवर बसायचं आहे का? उद्धव ठाकरेंच्या मनात जे आहे ते आता तोंडात आलं आहे अशी टीका परिणय फुके यांनी केली आहे. आता त्यांच्या या टीकेवर मनसे आणि ठाकरे गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निवडणूक आली की जरांगे बाहेर येतात
दरम्यान, मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरुन परिणय फुके यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. निवडणुका (Maharashtra Local Body Elections) आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात आणि निवडणूक झाली की बिळात जाऊन लपतात अशी टीका भाजप नेते परिणय फुके यांनी केली.
मराठी, शेतकरी कर्जमाफी अन् शक्तीपीठ, विरोधकांचा अजेंडा ठरला; दानवेंचं फडणवीसांना पत्र