- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
हिंदू मुलींच्या संरक्षणार्थ नितेश राणे धावले, उंबरे धर्मांतर प्रकरणी उद्या राहुरीत जनआक्रोश मोर्चा…
अहमदनगर – जिल्ह्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) आणि धर्मांतराची (Conversion) काही प्रकरणे समोर आली. उंबरे गावातही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण थेट अधिवेशनात चर्चेचा मुद्दा झाला. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान याच दोन मुद्द्यावरून उद्या (05 ऑगस्ट) रोजी जिल्ह्यातील राहुरीमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाला मोठ्या संख्यने नागरिकांनी तसेच सर्व […]
-
किणी अन् तासवडे टोल नाक्यांवरील वसुली कधी बंद होणार? कराडच्या आमदारांनी PWD मंत्र्यांना घेरलं
मुंबई : पुणे ते कागल या महामार्गाला 20 वर्ष पूर्ण झाली. यातील सातारा ते कागल या मार्गावर आता सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र तरीही इथे किणी आणि तासवडे टोल नाक्यांच्या माध्यमातून वसुली सुरु आहे. ही वसुली कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित करत कराडच्या दोन्ही आमदारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना विधानसभेतच घेरलं. यावर उत्तर […]
-
सुवेंद्र गांधींना पकडून हजर करा; दिल्ली न्यायालयाचे आदेश
Ahmednagar News : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी यांना एका खासगी प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने फरार घोषित केले आहे. सुवेंद्र गांधी यांना पकडून तीन दिवसांत न्यायालयात हजर करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हॉटेल व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना दिल्लीतील गणपती ट्रेडर्सकडून 2011 साली सुवेंद्र गांधी यांनी 8 कोटी रुपयांचे कर्ज घेतले […]
-
हॉटेल व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना
Solapur Hotel Owner Suicide : सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अजिंक्य जयवंत राऊत (वय 55 वर्षे ) असं या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे. सोलापुरातील लेडी डफरिन (इंदिरा गांधी) चौक ते जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाच्या दरम्यान हॉटेल ध्रुव हे राऊत यांचं हॉटेल आहे. त्यांच्या […]
-
Ahmednagar : गावच्या कारभाऱ्यांनो तयारीला लागा! ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच…
अहमदनगर – मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना (Ward composition) मार्च महिन्यांत जाहीर करण्यात आली होती. आता प्रभाग रचनेनुसार मतदार यादी 10 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 10 ते 21 ऑगस्ट दरम्यान हरकती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर या 188 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी 25 ऑगस्ट रोजी जारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. […]
-
एमआयडीसीला मंजुरी देण्याची कृपा करुन हाताला काम द्या, युवकाचं उद्योगमंत्र्यांना रक्तरंजित पत्र…
मागील काही दिवसांपासून नगर जिल्ह्यासह राज्यात कर्जत-जामखेड एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन लोकप्रतिनिधी देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मात्र, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाही. कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी आता एका युवकाने आपल्या रक्ताने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवले आहे. या मागणीसाठी आत्तापर्यंत मोठे आंदोलने देखील झाली आहेत. […]









