बुलढाणा : अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सहा महिने उलटूनही राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळं विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्यानं टीका केली जातेय. आता शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर परखड भाष्य केलंय. ते म्हणाले की, आम्ही कुणीही मंत्रीपदासाठी इच्छुक नाही पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतका वेळ […]
मुंबई : राज्यात थंड वारे वाहू लागल्याने नागपूरमध्ये अचानक पारा घसरला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी सुरू पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशात कालपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. देशात प्रामुख्याने उत्तर भारतात अचानक तापमानात […]
कोल्हापूर : कोल्हापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि हाच वारसा अद्याप ही छत्रपती घराणे पुढे घेऊन जात आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या निकाली कुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा छत्रपती […]
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, आमच्यावर टीका खूप टीका केली जात आहे. संजय राऊत आमच्यावर सातत्यानं टीका करताहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता दाढीवर हात फिरवला असता तरी संजय राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते, अशी […]
औरंगाबाद : नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यातच औरंगाबादमधून एका विद्यार्थ्याचा नायलॉन मांजानं गळा कापल्याची घटना समोर आली आहे. नायलॉन मांजावर नियंत्रण आणण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापणा करण्यात आली, मात्र पथक त्यामध्ये अपयशी ठरत असल्याचं दिसून येतंय. औरंगाबादमध्ये जेवणाचा डब्बा घेऊन जात असलेल्या एका विद्यार्थ्याचा गळा नायलॉन मांजाने कापल्याची घटना समोर आलीय. […]
अहमदनगर : जिल्ह्यातील आदिवासी भागातील राहीबाई पोपरे या देशी बियाणे संग्रहाक म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. मात्र या राहीबाईंचे भाषण राष्ट्रीय पातळीवरील एका विज्ञान विषयक कार्यक्रमात बंद करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे पडसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटू लागले आहेत. नागपूरमधील १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये महिला […]