- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
धक्कादायक! नायलॉन मांजानं कापला विद्यार्थ्याचा गळा
औरंगाबाद : नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यातच औरंगाबादमधून एका विद्यार्थ्याचा नायलॉन मांजानं गळा कापल्याची घटना समोर आली आहे. नायलॉन मांजावर नियंत्रण आणण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापणा करण्यात आली, मात्र पथक त्यामध्ये अपयशी ठरत असल्याचं दिसून येतंय. औरंगाबादमध्ये जेवणाचा डब्बा घेऊन जात असलेल्या एका विद्यार्थ्याचा गळा नायलॉन मांजाने कापल्याची घटना समोर आलीय. […]
-
अजित पवारांची काढली वैचारिक उंची, नितेश राणेंनी पुन्हा ललकारलं
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टिकेवरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तिखट शब्दात टीका केलीय. त्यांनी ट्वीट करत अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडलंय. देवानं मला दिलेल्या शरिरयष्टीवरुन भाष्य करुन अजित पवार यांची वैचारिक उंची समजते. त्यांना औरंग्यावरची टीका सहन झाली नाही हेच यावरुन सिद्ध झालं अशा आशयाचं ट्वीट करत अजित पवार […]
-
धक्कादायक! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा
औरंगाबाद : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय. लग्नामध्ये जेवण केल्यानंतर अनेक लोकांची प्रकृती बिघडली. सुदैवानं वेळीच उपचार मिळाल्यानं सर्वजण बचावले आहेत. विषबाधा झालेल्या सर्वांवर औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा […]
-
मुंबई विद्यापीठाच्या सीनेट निवडणुकीची चुरस वाढली, निवडणुकीचं वातावरण तापलं
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आगामी सीनेट निवडणुकीसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केलीय. मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई यांनी नुकतीच शिंदे गटाच्या पूर्वेश सरनाईक यांची भेट घेतलीय. गेल्या दहा वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या सीनेटवर आदित्य ठाकरे यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. त्यामुळं आदित्य ठाकरेंना धक्का देण्यासाठी अमित ठाकरे पुढे सरसावले आहेत. आदित्य […]
-
आज पुण्यात दुसरा टी 20 सामना, मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा इरादा
पुणे : वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं दोन धावांनी विजय मिळवला. यासह तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतानं 1-0 नं आघाडी घेतलीय. आज पुण्यात दुसरा टी 20 सामना होत आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. पहिल्या टी 20 […]
-
यल्लमा देवीच्या भाविकांचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
बेळगाव : जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झालाय. रामदुर्ग तालुक्याच्या चिंचनूर गावाजवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झालाय. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. देवीच्या दर्शनासाठी पिकअप वाहनातून हे भाविक प्रवास करत होते. नागमोडी रस्त्यामुळं ताबा सुटून वाहन […]
-
आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर बंद; आठ दिवस भाविकांसाठी दर्शन बंद
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. हे मंदिर पुढील आठ दिवस बंद असणार आहे. अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिलीय. येथील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. […]
-
ऐन थंडीच्या कडाक्यात अवकाळी पावसाची हजेरी, बळीराजा चिंतेत
मुंबई : राज्यात थंडीचा जोर कायम असतानाच दुसरीकडं काही भागात पावसानं हजेरी लावलीय. सध्या वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसताहेत. त्यामुळं कधी थंडी तर कधी पाऊस असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा मात्र चांगलाच धास्तावलाय. या पावसामुळं हातातोंडाशी आलेलं पीक वाया […]
-
दुचाकीचालक महिलेला ट्रकची भीषण धडक; तीन किलोमीटर नेलं फरफटत अन् पुढे…
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एका 20 वर्षीय तरुणीला कारनं तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी अशाच प्रकारची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका स्कुटीचालक महिलेला ट्रकनं धडक देऊन तिचा मृतदेह तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलाय. अपघातग्रस्त महिला आपल्या स्कुटीसह ट्रकमध्ये अडकल्यानं ट्रकला आग लागली. या दुर्दैवी घटनेत पीडितेची स्कूटीही […]
-
मी म्हणतो का माझ्या काकांना जाणता राजा म्हणा? अजित पवारांचा सवाल
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते असे सांगितले होते, त्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली. विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. त्यानंतर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यावर आपलं स्पष्टीकरण दिलं. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना परखड उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. […]









