Kolhapur collector office : आजवर अनेकदा तुम्ही सामान्य माणसांवर किंवा काही संस्थांवर जप्ती आल्याचं वाचलं असेल पण कधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती झाल्याचं ऐकलं आहे का, नसेल ऐकलं असेल. तर आता वाचा. कारण आज न्यायालयाने थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर जप्तीचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून थेट जिल्हाधिकारी […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे म्हटले आहे. यावरुन संजय राऊतांनी आता […]
अहमदनगर : रामनवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली हिंसक घटना ताजी असतानाच काल रात्री अहमदनगरमध्ये (Ahmednagar crime) दोन गटात राडा झाला. झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यात सहा व्यक्ती जखमी झाले तर एक वाहनाचे नुकसान झाले आहे. अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar Police) रस्त्यावर गजराजनगरमध्ये मंगळवारी दोन गट भिडले होते. झेंडा लावण्यावरुन वाद […]
नंदुरबार : शहरात (Nandurbar) मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत. दंगलचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या 6 ते 7 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Nandurbar Police) दिली. दोन गटातील वादातून ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. रामनवमीच्या दिवसापासून राज्यातील विविध भागातून हिंसाचार आणि […]
Shripad Mirikar Sad Demise :: महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार श्रीपाद मिरीकर यांचे निधन झाले आहे. स्नेहालयसह अनेक सामाजिक संस्थेचे ते आजीव सदस्य आणि पालक श्रीपाद रामराव तथा अण्णा मिरीकर यांचे आज मंगळवारी १०.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे. मिरी येथील सरदार घराण्यातील […]
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (swarkar) देशासाठी मोठा त्याग केला आहे. जर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नसतील आणि त्यांनी देशासाठी कुठलाही त्याग केला नसेल तर कुणीही या देशासाठी त्याग केला नाही. इतका मोठा त्याग त्यांनी आपल्या मातृभुमीसाठी केला आहे. मात्र, त्यांची कायम चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. 1947 नंतर जे राज्यकर्ते सत्तेत आली, त्यांनी सावरकर आणि […]